December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हाराजकीय

भिमा नदीत व उजनी उजवा कालवा व डाव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी: गणेश इंगळे

लवंग (युगारंभ )-युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी भिमा नदीत व उजनी उजवा कालवा व डाव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली आहे . संगम येथील चंद्रभागा नदी मधे उतरून युवा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले व सोलापूर जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यात यावा याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी पंढरपूरच्या पांडुरंगाला ही साकडे घालण्यात आले की सोलापूर जिल्ह्यात लवकर लवकर पाऊस पडू दे….

उशाला धरण, पायथ्याला नदी… बाजूला कालवा तरीही गावे पाण्यावाचून उपाशी…असे म्हणण्याची वेळ आली आहे उजनी धरण,भिमा नदी व उजवा व डावा कालवा कधी काळी सोलापूर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेली व लाखो एकर शेतीला पाणीपुरवठा करून परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत करणाऱ्या नदीचे पात्र ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप कोरडेच पडले आहे. याचा परिणाम शेतकरी तसेच घरगुती व सार्वजनिक विहिरीतील व बोअरवेल मधील पाण्याच्या पातळीवर झाला असून सर्वच विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत, जनावरांची पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचा प्रश्न आता दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.

     धो… धो पाऊस केव्हा येणार आणि विहिरीतील पाण्याची पातळी कधी सुधारणार, याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. परीणामी जनता पाण्यासाठी व पाऊसासाठी चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या विठूरायाला साकडे घालतानाचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. नेहमी भीमा नदीच्या पात्रात पाणी वाहू लागले किवा नदीचे पात्र भरले की सर्व सार्वजनिक विहिरींच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होऊन पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात लागत असे. मात्र यावर्षीचे चित्र वेगळेच झाले असून, अद्याप पावसाने म्हणावी तशी दमदार सुरुवात केली नसल्याने पाण्याचे दुर्भिक्ष अद्याप दिसून येत आहे

   भीमा नदीवर अवलंबून असलेली परिसरातील सुमारे हजारो हेक्टर शेती व नदीकाठच्या गावांच्या पाणी प्रश्न निर्माण झाला आहे.ऊस, फळबागा चारा व इतर,पिकांबरोबरच दुष्काळासारखी दाहकता प्रकर्षाने जाणवू लागली आहे.भीमा नदी आणि उजवा व डाव्या कालव्या शीवारालगतच्या भीमा नदी पात्रातील पाणी कधीच आटत नव्हते, परंतु यंदा पात्र कोरडे ठणठणीत पडले आहे. याचा परिणाम भीमानदी काठालगतच्या शेती शिवारावर व जनजीवनावर झाला आहे.

 प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार….

 पावसाळ्यात उजनी धरणातून भिमा नदीत व कालव्या ला सलग आवर्तन न ठेवता अंतर ठेवून केली असती तर सध्याची पाणी समस्या महिनाभर लांबवता आली असती,परंतु उजनी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शेतकऱ्यांना आत्ता बसताना दिसत आहे…*

परिणामी स्थानिक नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता पुरक अशी कुठलीही उपाययोजना प्रशासनाकडून होत नसल्याने स्थानिक प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सोलापूर जिल्ह्याला जीवनदायीनी देणारे उजनी धरणातील पाणी भीमा नदीच्या पात्रात व कालव्या मधे सोडले तर नदीचे पात्र भरलेले राहील. याचा परिणाम या भागातील हजारो एकर जमिनीत हातातोंडाला आलेल्या पीकांना होईल.. यासाठी प्रशासनाने,मंत्री, खासदार, आमदारांनी या उजनी धरणातील पाणी भीमा नदीच्या पात्रात व कालवयात जर सोडवण्यासाठी प्रयत्न केले तर खऱ्याअर्थाने या भागाचा पाणी प्रश्न सुटू शकतो. यासाठी तातडीने या संदर्भात बैठक बोलावून यावर विचारविनिमय करून या धरणातील पाणी भीमा नदीच्या पात्रात व कालवयात सोडण्यासाठी प्रयत्न करावे, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

  यावेळी नामदेव पराडे, दत्ता साळुंखे, गणेश भिताडे, सागर साळुंखे,मगन भोई, मुकुंद गायकवाड, हरिदास पराडे,देविदास इंगळे,बबन पराडे,लाला भोई,अशोक भोई, सोमनाथ भोई,महादेव पराड़े,गोवर्धन भोई,बापू भोई,सोमनाथ इंगळे, अर्जुन लांवड, अंकुश इंगळे,  आकाश पराडे,प्रवीण पराडे,विकास भोई,शंभो पराडे, शुभम भोई,गणेश काळे,अण्णा पाटील,अमित भोई, रोहित इंगळे, अक्षय भोई,अक्षय पराडे,अमोल भोई, दयानंद इंगळे,अनिकेत पराडे, नितिन ढवळे, अविनाश पराडे,सागर पोराळे इ.शेतकरी, शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

Related posts

महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग येथे दिपावली निमित्त ‘दिपावली शुभकामना’ कार्यक्रम साजरा

yugarambh

शाळेच्या नावाची कमान उभारणी करून महाराष्ट्र दिन साजरा- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववस्ती( कोंडबावी )

yugarambh

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून पुरवणी अर्थसंकल्पात माळशिरस तालुक्यासाठी १७.५० कोटींचा निधी

yugarambh

विधान परिषदेचे आमदार मा. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील* यांच्या *वाढदिवसानिमित्त*व भारताच्या स्वातत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

yugarambh

स.मा. वि. प्रशालेत महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती साजरी

yugarambh

राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या नावावर होणार जमिन.-आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधानपरिषदेत केला होता पाठपुरावा

yugarambh

Leave a Comment